Friday, March 23, 2012

बाललीला...


जा दिन जनम लीनौ भूपर भौसिला भूप ताहि दिन जीत्यौ अरि-उरके उछाहकौ
छठ्ठी छत्रपतिन कौ जीत्यौ भाग जीत्यौ नामकरन में करन के जसके उमाह कौ
भूषन भनत बाललीला गढकोट जीते साहिके सिवाजी करि चहूँ चक्क चाहकौ
गोलकुंडा, बीजापुर जीत्यौ लरिकाई ही में ज्वानी आए जीत्यौ दिल्लीपति पातशाहको

अर्थ -

ज्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशी या भोसले भूप शिवाजीने शत्रूंच्या हृदयातील उत्साह जिंकला. 'सहावीस' (महाराष्ट्रात पाचवीस पूजली जाते) त्याने नृपनरेशांचे भाग्य जिंकले. भूषण म्हणतो, बालवयात त्याने गडकोटजिंकले आणि चारी दिशांचा अधिपती व्हावयाची इच्छा केली. पोरवयातच त्याने विजापूर आणि गोवळकोंडाजिंकले आणि तारूण्यात प्रवेश करताच दिल्लींद्रासच जिंकले.

Saturday, August 13, 2011

महाराज सिवराज तुही जगदेव जनक...


आजु यहि समै महाराज सिवराज तुही जगदेव जनक जजाति अम्बरीक सो ।
भूषन भनत तेरे दान-जल जलधि मैं गुनिन को दारिद गयो बहि खरीक सो ।
चन्द कर किंजलक चाँदनी पराग उड-वृंद मकरंद बुन्द पुंज के सरीक सो ।
कुन्द सम कयलास नाक-गंग नाल तेरे जस पुंडरीक को अकास चंचरीक सो ॥

अर्थ -

हे शिवराय ! सांप्रत तुम्हीच जगदेव, ययाति जनक आणि अंबरीष आहांत. भूषण म्हणतो, तुमच्या दान जलाच्या समुद्रात गुणीजनांचे दारिद्र्य गवताच्या काडीप्रमाणे वाहून गेले. तुमच्या यशरूपी कमलावर आकाशरूप भ्रमर आहेत. चंद्रकिरणे ही त्या कमळातील बिसतंतु, चांदणे हा पराग, नक्षत्रे तोच मकरंद, कैलास हे मूळ (कंद) असून आकाशगंगा ही त्या कमळाचा देठ होय.

(उदा.-२ रे - मनहरण दंडक)

Saturday, June 25, 2011

बीछू के घाय गिरे अफजल्लहि ऊपर


दानव आयौ दगा करि जावली दीह भयारो महामद भार्‍यौ ।
भूषन बाहुबली सरजा तेहि भेटिबे कौं निरसंक पधार्‍यौ ।
बीछू के घाय गिरे अफजल्लहि ऊपर ही सिवराज निहार्‍यौ ।
दाबि यौं बैठो नरिंद अरिंदहि मानौ मयंद गयंद पछार्‍यौ ॥

अर्थ -

गर्वोन्मत्त आणि भयंकर असा अफजलरूपी राक्षस मोठ्या डामडौलाने, दगा करण्यासाठी आला. भूषण म्हणतो की ते बाहुबली शिवराय त्याही स्थितीत खानास भेटावयास निःशंक गेला. बिचव्याच्या घावाने खाली पडलेल्या अफजलखानावर, जसे नरेन्द्र अरीन्द्रावर बसतो किंवा मृगेंद्र गजेन्द्रावर बसतो तद्वतच शिवराय (अफजलवर) बसले.

उपर्यूक्त छंदाचे वैशिष्ट्य असे की भूषण असे लिहितो की शिवरायांनी अफजलवधासाठी बिचवा वापरला.

Thursday, May 26, 2011

स्वधर्म राख्यो घरमें.....




वेद राखे विदित पुरान राखे सार युत रामनाम राख्यो अति रसना सुधरमें

हिंदुंकी चोटी रोटी राखी है सिपाहिंकी, कांधेमें जनेउ राख्यो माला राखी गरमें

मीडि राखे मुगल मरोरी राखे पातसाह, बैरी पीसि राखे बरदान राख्यो करमें

राजन की हद्द राखी तेग बल सिवराज, देव राखे देवल स्वधर्म राख्यो घरमें

अर्थ :-

शिवरायांनी आपल्या तलवारीच्या जोरावर वेद आणि पुराणे यांचे संरक्षण केले. सर्वस्वाचे सार असे जे रामनाम ते
हिंदुंच्या जिभेवर कायम ठेवले. हिंदुंची शेंडी राखली आणि शिपायांची रोटी (उपजिविका) चालवली. खांद्यावरील जानवी आणी गळ्यातील माळा सुरक्षीत ठेवल्या. मोगलांचे यथास्थीत मर्दन केले. बादशाहास मुरगाळून टाकले, शत्रुचे चूर्ण केले. इतके करून आपल्या हाती वर देण्याचा आधिकार ठेवला. देवळात देव घरात कुलधर्म, कुलाचार कायम ठेवले.

Sunday, August 29, 2010

शिवजन्म


जा दिन जनम लीन्हो भूपर भुसिल भूप,
ताही दिन जीत्यो अरि-उर के उछाह को ।

छठी छत्रपतिन को जित्यो, भाग अनायास जीत्यो,
नामकरन मे करन-प्रवाह को ।

भूषन भनत बाललीला गढ कोट जीत्यो,
साहि के सिवाजी करि चहूँ चक्क चाह को ।

बीजापूर गोलकुंडा जीत्यो, लरीकाइ ही मै ज्वानी आए,
जीत्यो दिलीपति पातसाह को ॥

ज्या दिवशी भोसले घराण्यात शिवरायांनी जन्म घेतला त्याच दिवशी त्याने शत्रूंच्या अंतःकरणातील उत्साह जिंकला. छटीस* छत्रपतींच्या भाग्यास जिंकले. नामकरणाच्या दिवशी अनायासेच कर्ण-प्रवाहास (अर्थात कर्णाच्या शौर्यादार्याच्या किर्तीरूप प्रवाहास) जिंकले. भूषण म्हणतो, शाहजींच्या शिवरायांनी गड अन् कोट जिंकण्याची बाळक्रिडा केली. आणी चहूकडील अधिपत्य (सार्वभौमत्व) मिळावे अशी इच्छा केली. विजापूर, गोवळकोंडा पोर्वयात जिंकले आणी तारूण्यात प्रवेश करताच दिल्लीपती बादशहास जिंकले.

* छटी - महाराष्ट्रात मूल जन्मल्यावर पाचवे दिवशी विशेष पूजा करतात त्यास 'पाचवीस पुजले' म्हणतात. उत्तरेत अशी पूजा सहाव्या दिवशी करतात म्हणून 'छटी' म्हणतात.

Monday, July 5, 2010

चक्रवती चकता चतुरंगिनि


चक्रवती चकता चतुरंगिनि चारिउ चापि लई दिसि चक्का ।
भूप दरीन दुरे भनि भूषन एक अनेकन बारिधि नक्का ।
औरंग साहि सों साहि को नंद लरो सिव साहि बजाय के डंका ।
सिंह की सिंह चपेट सहै गजराज सहै गजराज को धक्का ॥

चक्रवर्ती चगताई वंशज औरंगजेबाने आपल्या चतुरंग सैन्याने चारी दिशा काबीज केल्या, त्यामुळे कित्येक राजे दर्‍याखोर्‍यात लपून बसले, तर कित्येक समुद्रपार झाले; भूषण म्हणतो, तरीपण अशा (दिग्वीजयी) औरंगशहाशी शाहजीपूत्र शिवाजी डंका वाजवून लढला. सिंहाची चपेट सिंह व हत्तिचा धक्का हत्तिच सहन करू शकतो. (१३३)

Saturday, May 8, 2010

महाराज सिवराज चढत तुरंग पर.......


महाराज सिवराज चढत तुरंग पर ।
ग्रीवा जात नै करि गनीम अतिबल की ।
भूषन चलत सरजा की सैन भूमि पर ।
छाती दरकत है खरी अखिल खल की ।
कियो दौरि घाव उमरावन अमीरन पै ।
गई कटि नांक सिगरेई दिली दलकी ।
सूरत जराई कियो दाह पातसाह उर ।
स्याही जाय सब पातसाही मुख झलकी ॥

अर्थ -

शिवाजी महाराज घोड्यावर बसताच अतिबलाढ्य अशा शत्रूची मान वाकू लागते. भूषण म्हणतो, सरजा (शिवरायांचे)चे सैन्य भूमीवरून चालले असता सर्व दुष्टांच्या छात्या फाटून जातात. दिल्ली दळावर चाल करून अमीर उमरावांवर घाव केल्यामुळे दिल्ली - सेनेचे नाक कापले गेले. सुरत शहर (इकडे) जाळल्यामुळे (तिकडे) बादशहाच्या उरात दाह होऊ लागला व तोंडास काळोखी लागली.