Wednesday, August 19, 2009


दूरजन दार भजि भजि बेसम्हार चढी, उत्तर पहार डरि सिवाजी नरिंन्द ते ।

भूषन भनत बिन भूषन बसन साधे, भूखन पियासन है नाहन को निंन्दते ।

बालक अयाने बाट बीचही बिलाने कुम्हिलाने, मुख कोमल अमल अरविंन्द ते ।

द्दगजल कज्जल कलित बढ्यो कढ्यो मानो, दूजा सोत तरनि तनूजा को कलिन्द ते ॥

अर्थ -


भूषण म्हणतो, त्या नरवीर शिवरायांच्या भीतीने शत्रु स्त्रिया आपली वस्त्रे, भूषणे टाकून उपाशी तापाशी नवर्‍यांच्या निंदा करीत अनिवारपणे धावून उत्तरे कडील पहाडांवर, पर्वतांवर चढू लागल्या आहेत. अज्ञान बालकांची निर्मल कमलांप्रमाणे असलेली कोमल मुखे कोमेजुन गेली.मूले वाट चुकून भलतीकडेच निघून गेली. त्यामुळे त्यांच्या मातांच्या काजळ घातलेल्या डोळ्यातून अश्रूंचा जो प्रवाह सुरु झा तो कालिंद पर्वतापासून निघालेल्या यमुनेचाच दूसरा ओघ आहे की काय असे वाटायला लागले आहे.

0 comments:

Post a Comment